Tuesday, 26 July 2016

भरकटलेली संवेदना

नगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला तो कोपर्डी गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने.
तसे पाहता ,बलात्कार , लैंगिक अत्याचार, विनयभंग , पीडितेच्या मृतदेहाची विटंबना हा प्रकार काही नवीन नाही भारत देशाला. दररोज ९० बलात्कार होणार आपला भारत देश आहे . (२०१४ च्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या सांख्यिकी नुसार)  परंतु एखाद "निर्भया" प्रकरण होऊन जातं, आणि सगळ्या देशाला मस्तक आदळायला लावत. सगळ्या देशाची झोपलेली संवेदना जागी करतं
कोपर्डी  प्रकरण सुद्धा "निर्भया" इतकेच संवेदनशील ,क्रूर आणि आख्या मानवजातीला काळिमा फासवनार आहे याबाबत दुमत नाही. परंतु ह्या प्रकरणाची झालेली राजकीय 'खिचडी' पाहून मात्र मन खिन्न होऊन जाते. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांणी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करून आपले इतिकर्तव्य पार पाडले आणि पुढेही पाडतील हीच अपेक्षा. आदरणीय न्यायालयावर तर आपला विश्वास आहेच.
निर्भयाच्या बाबतीत लोकांनी जी कमालीची संवेदनशीलता दाखवली ती खरचं कौतुकास्पद होती, आहे . सोशीअल मीडियावर सुद्धा हीच संवेदना पहायला मिळाली . निर्भयाची जात काय होती ?  तिचे खरे नाव काय आहे ? हे आजही सर्वसामान्य जनतेला माहिती नाही. तिला फक्त एक पीडित भारतीय स्त्री आणि अबला समजल्या गेले. दिल्ली पासून कन्याकुमारीपर्यंत तरुणाईने सरकारचे धाबे दणाणून सोडले. त्याचाच परिपाक म्हनूण बालगुन्हेगारीबद्दल कायद्यातील बदललेली तरतुद आहे. प्रत्येक तरुण हा निर्भयाला फक्त एक भारतीय स्त्री म्हणून बघत होता. तिच्यासोबत घडलेल्या पाशवी अत्याचाराबद्दल सगळ्या भारतीय तरुणांच्या  मनात द्वेष खदखदत होता. न्यायालयानेही जनतेचा रोष लक्षात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा केली.
कोपर्डी प्रकरणात मात्र ही संवेदना लोकं पूर्णतः विसरले. पीडितेचे खरे नाव तिच्या मृतदेहाचे फोटो सोशीअल मीडिया वर भराभर फिरू लागले. तिच्या जातीचा उल्लेख करून तिला एका विशिष्ट समाजपुरतेच बांधून ठेवले. हे सगळे करत असताना आपण समाजामध्ये अराजकता पसरवतोय याचे किंचितही भान नाही उरले या लोकांना. पीडितेचा फोटो आणि खरे नाव जाहीर केल्याने तिच्या कुटुंबाची होनारी कुचंबणा याला सुद्धा हेच लोक जबाबदार असतील. सगळे प्रकरण शांत झाल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना बघून एकमेकांच्या कानात होणारी कुजबुज ही त्यांच्या प्रतीष्ठेला संकुचित करणारी असेल, याचे भान ह्या गोष्टी शेअर करणाऱ्याने ठेवायला हवे होते. पीडितेचे खरे नाव आणि फोटो हा जाणीवपूर्वक मीडिया सुद्धा लपवत असते.कायद्याची संमती नसल्याने हे सौजन्य पाळल्या जाते. परंतु सोशीअल मीडियावर सुद्धा असले बंधन असायला हवे. पीडितेचा प्रतिष्ठेचे राजकारण करून आपली राजलीय पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांनी सुद्धा संवेदनेचे सगळे बंध तोडले , ह्या संवेदनशील प्रकरणाला जातीय आणि राजकीय रंग आनला ही सगळ्यात कमकुवत बाजू .
दुसरी गोष्ठ म्हणजे पीडितेच्या नातेवाईकला दलित नेत्यांना  भेटण्यास मज्जाव केला गेला. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राने या नेत्यांना ते 'दलित'च असल्याची जाणीव करून दिली. नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या घटनांनमध्ये आतापर्यंत पीडित हे दलित वरर्गातीलच लोकं होते. यावेळी त्यांना सगळ्या जाती धर्माचे राजकीय व्यक्तिमत्व भेट देऊन गेले. मात्र कोपर्डी प्रकरणात दलित नेत्यांना पीडितेच्या नातेवाइकांना भेटण्यास परवानगी नाकारणे कितपत योग्य आहे? कारण यावेळी अत्याचार करणारे दलित होते आणि पीडिता सवर्ण होती. परंतु आत्याचारी आणि आरोपीला कोणताही धर्म ,जात नसते.  त्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजेच.
जे सौजन्य निर्भयासाठी जनतेने दाखवले ते कोपर्डीतील निर्भयासाठी दाखवले गेले नाहि याचे दुःख वाटते. मुळात स्त्रियांवरील बलात्कार ही पौरुषी विकृतीतून प्रकट झालेली नीच भावना आहे. यासाठी  समाजावर आणि जणसामन्यावर कायद्याच्या धाकाबरोबरच वैचारिक प्रबोधन होणे ही तेवढेच गरजेचे आहे. बलात्कार होऊच  नये याकरिता पुरुष जातीमध्ये स्त्रियांबद्दलचे सुसंस्कार आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.
प्रेमकुमार शारदा ढगे
(९८६०३०३२१६)
premkumardhage.blogspot.com

भरकटलेली संवेदना

महेंद्र कुलकर्णी लिखित "एवढ्या विसंगती इथेच?" वाचला. नगर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला तो कोपर्डी गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने.
तसे पाहता ,बलात्कार , लैंगिक अत्याचार, विनयभंग , पीडितेच्या मृतदेहाची विटंबना हा प्रकार काही नवीन नाही भारत देशाला. दररोज ९० बलात्कार होणार आपला भारत देश आहे . (२०१४ च्या क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या सांख्यिकी नुसार)  परंतु एखाद "निर्भया" प्रकरण होऊन जातं, आणि सगळ्या देशाला मस्तक आदळायला लावत. सगळ्या देशाची झोपलेली संवेदना जागी करतं

कोपर्डी  प्रकरण सुद्धा "निर्भया" इतकेच संवेदनशील ,क्रूर आणि आख्या मानवजातीला काळिमा फासवनार आहे याबाबत दुमत नाही. परंतु ह्या प्रकरणाची झालेली राजकीय 'खिचडी' पाहून मात्र मन खिन्न होऊन जाते. गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांणी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही करून आपले इतिकर्तव्य पार पाडले आणि पुढेही पाडतील हीच अपेक्षा. आदरणीय न्यायालयावर तर आपला विश्वास आहेच.

निर्भयाच्या बाबतीत लोकांनी जी कमालीची संवेदनशीलता दाखवली ती खरचं कौतुकास्पद होती, आहे . सोशीअल मीडियावर सुद्धा हीच संवेदना पहायला मिळाली . निर्भयाची जात काय होती ?  तिचे खरे नाव काय आहे ? हे आजही सर्वसामान्य जनतेला माहिती नाही. तिला फक्त एक पीडित भारतीय स्त्री आणि अबला समजल्या गेले. दिल्ली पासून कन्याकुमारीपर्यंत तरुणाईने सरकारचे धाबे दणाणून सोडले. त्याचाच परिपाक म्हनूण बालगुन्हेगारीबद्दल कायद्यातील बदललेली तरतुद आहे. प्रत्येक तरुण हा निर्भयाला फक्त एक भारतीय स्त्री म्हणून बघत होता. तिच्यासोबत घडलेल्या पाशवी अत्याचाराबद्दल सगळ्या भारतीय तरुणांच्या  मनात द्वेष खदखदत होता. न्यायालयानेही जनतेचा रोष लक्षात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा केली.

कोपर्डी प्रकरणात मात्र ही संवेदना लोकं पूर्णतः विसरले. पीडितेचे खरे नाव तिच्या मृतदेहाचे फोटो सोशीअल मीडिया वर भराभर फिरू लागले. तिच्या जातीचा उल्लेख करून तिला एका विशिष्ट समाजपुरतेच बांधून ठेवले. हे सगळे करत असताना आपण समाजामध्ये अराजकता पसरवतोय याचे किंचितही भान नाही उरले या लोकांना. पीडितेचा फोटो आणि खरे नाव जाहीर केल्याने तिच्या कुटुंबाची होनारी कुचंबणा याला सुद्धा हेच लोक जबाबदार असतील. सगळे प्रकरण शांत झाल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना बघून एकमेकांच्या कानात होणारी कुजबुज ही त्यांच्या प्रतीष्ठेला संकुचित करणारी असेल, याचे भान ह्या गोष्टी शेअर करणाऱ्याने ठेवायला हवे होते. पीडितेचे खरे नाव आणि फोटो हा जाणीवपूर्वक मीडिया सुद्धा लपवत असते.कायद्याची संमती नसल्याने हे सौजन्य पाळल्या जाते. परंतु सोशीअल मीडियावर सुद्धा असले बंधन असायला हवे. पीडितेचा प्रतिष्ठेचे राजकारण करून आपली राजलीय पोळी भाजणाऱ्या राजकारण्यांनी सुद्धा संवेदनेचे सगळे बंध तोडले , ह्या संवेदनशील प्रकरणाला जातीय आणि राजकीय रंग आनला ही सगळ्यात कमकुवत बाजू .

दुसरी गोष्ठ म्हणजे पीडितेच्या नातेवाईकला दलित नेत्यांना  भेटण्यास मज्जाव केला गेला. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राने या नेत्यांना ते 'दलित'च असल्याची जाणीव करून दिली. नगर जिल्ह्यामध्ये झालेल्या आणि राज्यभर गाजलेल्या घटनांनमध्ये आतापर्यंत पीडित हे दलित वरर्गातीलच लोकं होते. यावेळी त्यांना सगळ्या जाती धर्माचे राजकीय व्यक्तिमत्व भेट देऊन गेले. मात्र कोपर्डी प्रकरणात दलित नेत्यांना पीडितेच्या नातेवाइकांना भेटण्यास परवानगी नाकारणे कितपत योग्य आहे? कारण यावेळी अत्याचार करणारे दलित होते आणि पीडिता सवर्ण होती. परंतु आत्याचारी आणि आरोपीला कोणताही धर्म ,जात नसते.  त्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजेच.

जे सौजन्य निर्भयासाठी जनतेने दाखवले ते कोपर्डीतील निर्भयासाठी दाखवले गेले नाहि याचे दुःख वाटते. मुळात स्त्रियांवरील बलात्कार ही पौरुषी विकृतीतून प्रकट झालेली नीच भावना आहे. यासाठी  समाजावर आणि जणसामन्यावर कायद्याच्या धाकाबरोबरच वैचारिक प्रबोधन होणे ही तेवढेच गरजेचे आहे. बलात्कार होऊच  नये याकरिता पुरुष जातीमध्ये स्त्रियांबद्दलचे सुसंस्कार आणि प्रबोधन होणे गरजेचे आहे.

प्रेमकुमार शारदा ढगे
(९८६०३०३२१६)
premkumardhage.blogspot.com

Monday, 11 July 2016

पाऊस...

रिहर्सल संपऊन कॉलेजच्या बाहेर आलो. सोबत आकाश हि होताच. थंड पावसाच्या धारांमध्ये गरमागरम कॉफी पिऊन नेमकाच बाहेर आलो होतो. रसिका आणि प्रज्ञा या दोघी कॉलेज कॅम्पसच्या बाहेर गेल्यानंतरच आम्ही आमची बाईक बाहेर काढली. आगोदर दोन वेळेस बाहेर आलं कि पाऊस चालू झाल्यामुळं आमचं निघन रखडलं होतं . शेवटी कंटाळून निघालो एकदाचे.

थंडगार रिमझिम पावसाच्या धारा अंगावर झेलत, थंड आणि बोचऱ्या हवेचा स्पर्श होताना चराचर अंगावर काटा उभा राहत होता. टीप टीप पडणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या  तालावर, उभ्या अंगात हुडहुडी भरलेली असताना, आकाशची मोटारसायकल भिजलेल्या डोक्यावरील पावसाचे थेंबं पँटवर उडवणाऱ्या वाऱ्यासोबत स्पर्धा खेळत होती. आणि हा वारा आम्हाला कधी जास्त तर कधी वेगात वाहून हुलकावण्या देत होता. कदाचित तो आमची परवड पाहून गालातल्या गालात हसत असावा. आभाळातून वरुण राजाही हा सगळा खेळ पाहून मिश्किल पणे हसत असावा. म्हणूनच कि काय ,पण तो सुद्धा मधातच आपल्या टपोऱ्या थेंबानी आकाशच्या हेल्मेटला  सडकून काढू लागला. मी मात्र बापडा आकाशच्या पाठीमागे माझं तोंड लपवून त्याला चुकविण्याचा अयशस्वी प्रयत्न करू पाहत होतो. असो...

पाहता पाहता आकाशची बाईक मिलिंद कॉलेज पार करून ,छावणी मध्ये आली. आज हॉली क्रॉस शाळेजवळ सुद्धा पावसात पण खूप गर्दी होतो. कसेबसे पुढे आलो.  सगळ्या गाड्यांच्या काचा पूर्णपणे बंद केलेल्या दिसत होत्या, आणि बऱ्याच गाड्यावाल्यांनी आपापल्या गाड्यांचे दिवे चालू केले होते. एक चारचाकी दूर असलेल्या खड्यातून पाणी उडवत गेली.पावसानं साचलेल्या आणि गढूळ झालेल्या पाण्याच्या सोनेरी रंगछटा माझ्या पँटवर आपसूकच उमटल्या. चारचाकी वाल्या ड्रायव्हरला शिव्या घालण्याची इच्छा झाली पण काही उपयोग नव्हता. "बुरा ना मानो होली है" यासारख "बुरा ना मानो बारिश है" हे मी स्वतः च ग्राह्य धरलं होत. शिवाय त्याच्या चारचाकीच्या सगळ्या काचाही बंद होत्या .

राजस्थानी हॉटेलच्या जवळ असल्या चौकामध्ये खूपच जास्त वाहतूक होती. गाडी खूपच हळून चालवत होता आकाश. समोरच्या स्कॉर्पियोचा लाल लाईट लागला, हे पाहुन आकाशन बाईक थांबवली.माझ्या मागे लगेच दुसरी मोटार सायकल येऊन थांबली. उजव्या हाताच्या मोकळ्या जागेत, काळ्या रंगाची प्लेजरवाली लाल रंगाचा टॉप घालून भेजलेले केसं सावरताना माझ्या नजरेतून सुटली नाहि. अगदी जवळ येऊन तिची गाडी थांबल्यामूळ थोडं अनकंफोर्ट वाटत होत मला आणि तिला सुद्धा. त्यामुळं माझी नजर मी डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेवर थांवबलेल्या लोकांकडे वळवली. रस्त्याच्या कडेला खूप साऱ्या महिला आमच्या गाड्या पुढे जाण्याची वाट पाहत थांबल्या होत्या.

दोन बाया एकाच छत्रीमध्ये स्वतःला पावसापासून लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. या सगळ्या गर्दीमध्ये मला रस्त्याच्या एका कोपऱ्यात अगदी नव्वद अंशाच्या कोनामध्ये वाकलेली म्हातारी दिसली. एका ह्यामध्ये काठी आणि दुसरा हात तिच्या डोक्यावर असलेल्या प्लास्टिकच्या कापडाला सावरत होता. ते कापड वाऱ्याच्या वेगानं सारख हालत उडून जाण्याचा प्रयत्न करत होत. म्हातारी त्याला तसच खाली वाकून घट्ट पकडून ठेवत होती. म्हातारीला तिच्या समोर वाहने उभी आहेत हे सुद्धा स्पष्ट दिसत नसावं कारण ती पूर्णपणे कमरेमधून खाली वाकली होती. तिच्या प्लास्टिकच्या कापडामधून सुटलेल्या  पांढऱ्या केसावरून खाली पडणारे पाणी स्पष्ट दिसत होते. वयाने नक्कीच सत्तरीच्या पुढे असायला पाहिजे होती ती. शेजारी उभ्या असलेल्या बायांकडं पाहून "आग  मला कुणीतरी तिकडं नेऊन सोडा ग" अशी  विनवणी करू लागली. दोघीत एक छत्री शेअर करणाऱ्यापैकि एकजण बोलली. "म्हातारे कशाला आलीस. पावसापण्याचं घरीच बसायचस कि."  हे ऐकताना मान वर करून पाहताना म्हातारीच्या डोक्यावरचे कापड उडून जाणार एवढ्यात तिने ते परत एकदा घट्ट पकडून ठेवले.

हे बघून मी आकाशला , "आकाश मी सोडू का रे त्या म्हातारीला ?" अस  विचारलं. पण हेल्मेट डोक्यावर असल्यामुळं त्याला ऐकायला नाही आलं. हे बघून उजव्या हाताची 'प्लेजरवाली' गालातल्या गालात हसली. मागचे लोक हॉर्न वाजउ लागले. काढा लवकर गाड्या , रस्ता मोकळा करा अस आजूबाजुवाले सुचउ लागले. आकाश ने बाईकचा वेग वाढवला तसा मागे वळून पाहत असताना पावसात भिजत अर्ध्यामध्ये वाकलेली आजीबाई फारच केविलवाणी दिसू लागली. बाईक दूर जाईल तशी आजी माझ्या नजरेपासून दूर चालली होती.

काहि क्षणातच थोडं दूर गेलं असताना फोनची रिंग वाजली. फोन होता माझ्या स्वतः च्या आजीचा."पप्पू, पाऊस चालू आसन तर पासापाण्याचं बाहिर फिरू नको बरका..! "  हे ऐकताना माझ्या मनात पावसात भिजणाऱ्या आजिच्या नातवाचा विचार आला. ...

प्रेमकुमार शारदा ढगे
premkumardhage. blogspot. com

पाऊस...

रिहर्सल संपऊन कॉलेजच्या बाहेर आलो. सोबत आकाश हि होताच. थंड पावसाच्या धारांमध्ये गरमागरम कॉफी पिऊन नेमकाच बाहेर आलो होतो. रसिका आणि प्रज्ञा या दोघी कॉलेज कॅम्पसच्या बाहेर गेल्यानंतरच आम्ही आमची बाईक बाहेर काढली. आगोदर दोन वेळेस बाहेर आलं कि पाऊस चालू झाल्यामुळं आमचं निघन रखडलं होतं . शेवटी कंटाळून निघालो एकदाचे.

थंडगार रिमझिम पावसाच्या धारा अंगावर झेलत, थंड आणि बोचऱ्या हवेचा स्पर्श होताना चराचर अंगावर काटा उभा राहत होता. टीप टीप पडणाऱ्या पावसाच्या थेंबांच्या  तालावर, उभ्या अंगात हुडहुडी भरलेली असताना, आकाशची मोटारसायकल भिजलेल्या डोक्यावरील पावसाचे थेंबं पँटवर उडवणाऱ्या वाऱ्यासोबत स्पर्धा खेळत होती. आणि हा वारा आम्हाला कधी जास्त तर कधी वेगात वाहून हुलकावण्या देत होता. कदाचित तो आमची परवड पाहून गालातल्या गालात हसत असावा. आभाळातून वरुण राजाही हा सगळा खेळ पाहून मिश्किल पणे हसत असावा. म्हणूनच कि काय ,पण तो सुद्धा मधातच आपल्या टपोऱ्या थेंबानी आकाशच्या हेल्मेटला  सडकून काढू लागला. मी मात्र बापडा आकाशच्या पाठीमागे माझं तोंड लपवून त्याला चुकविण्याचा अयशस्वी प्रयत्न करू पाहत होतो. असो...

पाहता पाहता आकाशची बाईक मिलिंद कॉलेज पार करून ,छावणी मध्ये आली. आज हॉली क्रॉस शाळेजवळ सुद्धा पावसात पण खूप गर्दी होतो. कसेबसे पुढे आलो.  सगळ्या गाड्यांच्या काचा पूर्णपणे बंद केलेल्या दिसत होत्या, आणि बऱ्याच गाड्यावाल्यांनी आपापल्या गाड्यांचे दिवे चालू केले होते. एक चारचाकी दूर असलेल्या खड्यातून पाणी उडवत गेली.पावसानं साचलेल्या आणि गढूळ झालेल्या पाण्याच्या सोनेरी रंगछटा माझ्या पँटवर आपसूकच उमटल्या. चारचाकी वाल्या ड्रायव्हरला शिव्या घालण्याची इच्छा झाली पण काही उपयोग नव्हता. "बुरा ना मानो होली है" यासारख "बुरा ना मानो बारिश है" हे मी स्वतः च ग्राह्य धरलं होत. शिवाय त्याच्या चारचाकीच्या सगळ्या काचाही बंद होत्या .

राजस्थानी हॉटेलच्या जवळ असल्या चौकामध्ये खूपच जास्त वाहतूक होती. गाडी खूपच हळून चालवत होता आकाश. समोरच्या स्कॉर्पियोचा लाल लाईट लागला, हे पाहुन आकाशन बाईक थांबवली.माझ्या मागे लगेच दुसरी मोटार सायकल येऊन थांबली. उजव्या हाताच्या मोकळ्या जागेत, काळ्या रंगाची प्लेजरवाली लाल रंगाचा टॉप घालून भेजलेले केसं सावरताना माझ्या नजरेतून सुटली नाहि. अगदी जवळ येऊन तिची गाडी थांबल्यामूळ थोडं अनकंफोर्ट वाटत होत मला आणि तिला सुद्धा. त्यामुळं माझी नजर मी डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेवर थांवबलेल्या लोकांकडे वळवली. रस्त्याच्या कडेला खूप साऱ्या महिला आमच्या गाड्या पुढे जाण्याची वाट पाहत थांबल्या होत्या.

दोन बाया एकाच छत्रीमध्ये स्वतःला पावसापासून लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. या सगळ्या गर्दीमध्ये मला रस्त्याच्या एका कोपऱ्यात अगदी नव्वद अंशाच्या कोनामध्ये वाकलेली म्हातारी दिसली. एका ह्यामध्ये काठी आणि दुसरा हात तिच्या डोक्यावर असलेल्या प्लास्टिकच्या कापडाला सावरत होता. ते कापड वाऱ्याच्या वेगानं सारख हालत उडून जाण्याचा प्रयत्न करत होत. म्हातारी त्याला तसच खाली वाकून घट्ट पकडून ठेवत होती. म्हातारीला तिच्या समोर वाहने उभी आहेत हे सुद्धा स्पष्ट दिसत नसावं कारण ती पूर्णपणे कमरेमधून खाली वाकली होती. तिच्या प्लास्टिकच्या कापडामधून सुटलेल्या  पांढऱ्या केसावरून खाली पडणारे पाणी स्पष्ट दिसत होते. वयाने नक्कीच सत्तरीच्या पुढे असायला पाहिजे होती ती. शेजारी उभ्या असलेल्या बायांकडं पाहून "आग  मला कुणीतरी तिकडं नेऊन सोडा ग" अशी  विनवणी करू लागली. दोघीत एक छत्री शेअर करणाऱ्यापैकि एकजण बोलली. "म्हातारे कशाला आलीस. पावसापण्याचं घरीच बसायचस कि."  हे ऐकताना मान वर करून पाहताना म्हातारीच्या डोक्यावरचे कापड उडून जाणार एवढ्यात तिने ते परत एकदा घट्ट पकडून ठेवले.

हे बघून मी आकाशला , "आकाश मी सोडू का रे त्या म्हातारीला ?" अस  विचारलं. पण हेल्मेट डोक्यावर असल्यामुळं त्याला ऐकायला नाही आलं. हे बघून उजव्या हाताची 'प्लेजरवाली' गालातल्या गालात हसली. मागचे लोक हॉर्न वाजउ लागले. काढा लवकर गाड्या , रस्ता मोकळा करा अस आजूबाजुवाले सुचउ लागले. आकाश ने बाईकचा वेग वाढवला तसा मागे वळून पाहत असताना पावसात भिजत अर्ध्यामध्ये वाकलेली आजीबाई फारच केविलवाणी दिसू लागली. बाईक दूर जाईल तशी आजी माझ्या नजरेपासून दूर चालली होती.

काहि क्षणातच थोडं दूर गेलं असताना फोनची रिंग वाजली. फोन होता माझ्या स्वतः च्या आजीचा."पप्पू, पाऊस चालू आसन तर पासापाण्याचं बाहिर फिरू नको बरका..! "  हे ऐकताना माझ्या मनात पावसात भिजणाऱ्या आजिच्या नातवाचा विचार आला. ...

प्रेमकुमार शारदा ढगे
premkumardhage. blogspot. com

जळालेला न्याय!

दिल्ली उच्च नायायलायाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी जळत्या नोटा सापडल्याने एकंदरीतच सगळ्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ...